Team India Captaincy Virat Kohli vs Rohit Sharma:कोहलीकडे पुन्हा टीम इंडियाची कमान? रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; रोहित शर्माबद्दल म्हणाले…

Team India Captaincy Virat Kohli vs Rohit Sharma:कोहलीकडे पुन्हा टीम इंडियाची कमान? रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; रोहित शर्माबद्दल म्हणाले…

Rate this post

Team India Captaincy Virat Kohli vs Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधारपदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थिती संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे देता येई शकतं, असं वक्तव्य रवी शास्त्री यांनी केलं आहे. शास्त्री यांनी म्हटलं आहे की, जर टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कोणत्याही कारणास्तव कोणताही सामना खेळत नसेल, तर अशा परिस्थितीत त्या सामन्याचे महत्त्व लक्षात घेत विराट कोहलीला संघाचं कर्णधारपद दिलं पाहिजे.

Also Read  Hanuman jayanti 2023 Hindi

”विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवायला हवं”

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कर्णधार रोहित शर्मा कोणत्याही कारणास्तव उपलब्ध नसल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसारख्या मोठ्या सामन्यांमध्ये विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवायला हवं, असं मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय.

विराट कोहलीकडे पुन्हा टीम इंडियाची कमान?

शास्त्री पुढे म्हणाले की, भारतीय संघ व्यवस्थापनाने गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्याच्या पुढे ढकलण्यात आलेल्या शेवटच्या कसोटीत कोहलीला संघाचे नेतृत्व करण्यास सांगायला हवं होतं. या रोहित त्या सामन्यासाठी उपलब्ध नसताना दौऱ्यातील शेवटचा सामना पुढे ढकलण्यात आला होता.

Also Read  Wakeup With Headache:सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवतोय? मग दुर्लक्ष नको, जाणून घ्या का ते?

”भारतीय संघाने विचार केला पाहिजे”

शास्त्री यांनी ESPNcricinfo ला सांगितलं की, “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यासाठी रोहित तंदुरुस्त असावा असंच मला वाटतं कारण तो कर्णधार आहे, पण जर तो कोणत्याही कारणाने खेळू शकत नसेल तर भारतीय संघाने त्या दिशेने विचार केला पाहिजे. शास्त्री म्हणाले की, इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतही असेच करायला हवं होतं.”

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया WTC फायनल

संघाला इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून भारतीय विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC) अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने 24 एप्रिल रोजी टीम इंडियाची घोषणाही केली आहे.

Also Read  World Highest Paid Country:अमेरिका, ब्रिटन नाही तर 'या' देशातील लोकांना मिळतो सर्वात जास्त पगार, भारत कितव्या स्थानावर?

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

1 thought on “Team India Captaincy Virat Kohli vs Rohit Sharma:कोहलीकडे पुन्हा टीम इंडियाची कमान? रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; रोहित शर्माबद्दल म्हणाले…”

  1. Hi, I think your site might be having browser compatibility issues. When I look at your website in Safari, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up! Other then that, fantastic blog!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?